स्क्रीन रीडर
 
    1 2  
         

उत्पादन: महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित बियाणे उत्पादन उपक्रम

परिचय

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला, मार्फत दरवर्षी सुमारे २.५ लाख एकर क्षेत्रावर जवळजवळ पन्नास हजार बिजोत्पादक शेतक-यांच्या माध्यमातून खरीप/रब्बी हंगामामध्ये विविध पिक/वाणांचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. त्याकरीता शिस्तबध्द पध्दतीने पायाभुत बियाण्याचे वाटप करण्यात येते आणि ‍बिजोत्पादन क्षेत्राचे वेळोवेळी निरिक्षण शेतकरी स्तरावर केले जाते. तसेच बियाणे गुणवत्ता अभियान राबवून उच्च प्रतीचे बियाणे निर्धारीत वेळेत शेतक-यांना उपलब्ध करून देण्याकरीता कसोशीने प्रयत्न करण्यात येते. या बिजोत्पादक शेतक-यांना योग्य दर, लक्षांकपूर्तीनुसार प्रोत्साहनपर वा गुणवत्तेच्या आधारावर वाढीव दर इत्यादींद्वारे बिजोत्पादक शेतक-यांना उच्च दर्जाचे बियाणे उत्पादनाकरीता प्रोत्साहीत करण्यात येते.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने, महामंडळ मुख्यत्वे करून मोठया प्रमाणात कमी किंमतीच्या पीकांचे बियाणे उत्पादन करते, ज्यामध्ये कडधान्ये, तेलबिया, ताग पिके, हिरवळीची पिके, चारा पिके आणि अव्‍दितीय पांढरे सोने (कापूस पिके) ह्रयांचा समावेश आहे.

दरवर्षी महाबीज १० लाख ‍क्विंटल पेक्षा अधिक प्रमाणीत/सत्यप्रत बियाणे आणि १.२० ते १.५० लाख क्विंटल पायाभुत बियाणे भाजीपाला पिकांसह तयार करत आहे.

बियाणे उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत विविध योजना

ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत एका गावात सलग ‍बिजोत्पादन क्षेत्राचे आयोजन करण्याकरीता महामंडळाद्वारे “ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम” योजना लागु करण्यात आलेली आहे. ह्रया योजनेमध्ये महामंडळाद्वारे आयोजित केलेल्या क्षेत्रानुसार बिज प्रमाणीकरण यंत्रणेच्या शुल्कामध्ये १००%, ७५%, व ५०% सुट दिली जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बियाणे उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा योजना नियमितपणे लागु केल्या जातात ज्यामुळे विविध संकरीत आणि सरळ वाणांच्या दर्जेदार बियाणे उत्पादन कार्यक्रमासाठी बिजोत्पादकांना आकर्षित करण्यात येते.:

  • १. बिजोत्पादन कार्यक्रम आगाऊ आरक्षण योजनेमध्ये सहभागी झालेल्या बिजोत्पादकांना नोंदणी शुल्क सुट देण्यात येते.
  • २. सलग क्षेत्र नोंदणीसाठी क्षेत्र तपासणी शुल्क सुट देण्यात येते.
  • ३. उच्च दर्जाच्या बियाणे उत्पादनाकरीता विशेष ‍अतिरिक्त प्रोत्साहनपर रक्कम योजना.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य, गळीतधान्य आणि तृणधान्य प्रमाणित बियाण्यांची मागणी लक्षात घेता, महाबीजमार्फत या योजनेअंतर्गत प्रमाणीत बियाणे वितरणासाठी कडधान्यांमध्ये मूग, उडीद, तूर व हरभरा इत्यादी पिकांचे तसेच तेलबिया पिकांमध्ये सोयाबीन आणि तृणधान्यामध्ये भात, रब्बी ज्वारी पिकांचे उत्पादन मोठया प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे या पिकांमध्ये बियाणे बदल दर वाढण्यास मदत झालेली आहे.

महामंडळ तृणधान्य, कडधान्य व तेलबिया पिकांमध्ये नवीन वाणांचे मोठया प्रमाणात प्रमाणीत बियाणे उत्पादन करीत आहे. त्यामुळे या पिकातील प्रती हेक्टर उत्पादकता वाढीस मदत होत आहे.

 



*

खान आसिफ अहमद (संगणक व्‍यवस्‍थापक, महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादित) यांनी डिझाइन आणि विकसित केल

*